धाराशिव – धाराशिव शहरातील प्रभाग चारमधील नगरसेवकाने बांधकाम परवानगी न घेता कथितरीत्या अवैध बांधकाम केल्याची तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप प्रभावी कारवाई केली नसल्याच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन संबंधितावर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
साळुंके यांनी संबंधित अवैध बांधकामाबाबत 2 जून रोजी नगर परिषद, धाराशिव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर 8 /6/26रोजी नगर परिषद प्रशासनाने संबंधितांना नोटीस काढल्याचे सांगितले. मात्र, त्यानी नोटीस अमलबजावणी केली 13/7/26 अन सात दिवसात खुलासा देणे बंधनकारक परंतु खुलासा देणेस पुन्हा 15 दिवसाची मुदत वाढ मागितली अन न प ने दिली याचीही मुदत 05/08/26 लां संपली पुन्हा मुदत वाढ न प ने मंजुरी दिली मग ही अशी मुदत वाढ कायद्याने एकदा देता येते का तर तशी देता येत नसल्याचा दावा साळुंके यांनी केला.


तसेच नगर परिषद प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचे तक्रारकर्ते साळुंके यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा प्रशांत साळुंके यांनी दिला होता. त्यानंतर देखील कारवाई न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र देऊन संबंधितावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.











