धाराशिव – धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, पीक अनुदान व आर्थिक मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे दि.७ सप्टेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की धाराशिव तालुक्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिलेला आहे. त्यामुळे खरीप पिके पावसाअभावी वाळून गेलेली आहेत. धाराशिव तालुक्यात पाऊस नसल्यामुळे पिकांची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनावरांना चारा नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पिकांचे त्वरित पंचनामे करून पीक विमा, पीक अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विचार विभागाचे अध्यक्ष खलील सय्यद, जावेद काझी, धाराशिव शहराध्यक्ष धनंजय राऊत, बालाजी हूबाले, बाळासाहेब मोरे, संजय गजधने, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, अंकुश पेठे, संदीप कदम, धोंडीराम करंजकर, सुधीर गव्हाणे, संतोष वडवले, इमाम शेख, डॉ.रमाकांत वाघमारे, विकास ढवळे, दिगंबर गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











