• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धुक्याने सामना रद्द; बीसीसीआयच्या नियोजनाचा गलथान कारभार? चाहत्यांचा रोष शिगेला

MH25News by MH25News
December 18, 2025
in क्रीडा, जागतिक, तंत्रज्ञान, संपादकीय
0
धुक्याने सामना रद्द; बीसीसीआयच्या नियोजनाचा गलथान कारभार? चाहत्यांचा रोष शिगेला
0
SHARES
38
VIEWS

भारत दक्षिण-आफ्रिका यांच्यातील लखनऊच्या मैदानावर होणारा चौथा टी-20 सामना मैदानावर धुक्याची चादर पसरल्याने अखेर रद्द करण्याची वेळ आली. मैदानावर खेळाडू उतरायच्या आधीच परिस्थिती इतकी धोकादायक झाली की सामना खेळवणं अशक्य ठरलं. हा केवळ एक सामना रद्द होण्याचा प्रकार नव्हता, तर भारतीय क्रिकेट नियोजनावर पुन्हा एकदा बोट ठेवलं गेलं.

डिसेंबर आला की उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये दाट धुके, थंड हवा आणि प्रदूषण यांचा त्रास वाढतो, हे नवं नाही. दिल्ली, लखनऊसारख्या भागांमध्ये याच काळात दृश्यमानता कमी होणं, खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होणं आणि सामन्यांच्या वेळापत्रकात गोंधळ होणं, हे वर्षानुवर्षे पाहायला मिळतं. तरीही दरवेळी आंतरराष्ट्रीय सामने याच काळात इथेच ठेवले जातात आणि नंतर अनिश्चिततेचा खेळ सुरू होतो.

या सामन्याच्या रद्दीकरणानंतर चाहते आणि क्रिकेट अभ्यासकांनी पुन्हा एकदा बीसीसीआयच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. “हवामानाचा अंदाज घेणं इतकं अवघड आहे का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. अनेक क्रिकेटप्रेमींना असं वाटतं की हिवाळ्यातील महत्त्वाचे सामने दक्षिण भारतातील शहरांमध्ये ठेवणं हा जास्त व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद किंवा तिरुवनंतपुरमसारख्या ठिकाणी या काळात हवामान तुलनेने स्थिर असतं आणि सामने सुरळीत पार पडण्याची शक्यता अधिक असते.

https://x.com/Cric_Rishabh/status/2001308564816867514?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2001308564816867514%7Ctwgr%5E945ad09e0920582e1bb983e8cd26f72d40820475%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.in%2Findia-vs-south-africa-4th-t20-called-off-due-to-fog-fans-question-bcci-planning-winter-matches-in-north-india%2F

Follow us on social media:

सतत अशा घटना घडणं ही केवळ चाहत्यांसाठी निराशाजनक बाब नाही, तर खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंतेची गोष्ट आहे. मैदानावर उतरण्यापूर्वीच सामना रद्द व्हावा, ही कोणालाच नको असलेली परिस्थिती आहे. याचा फटका संघाच्या तयारीला, प्रेक्षकांच्या उत्साहाला आणि प्रसारकांच्या नियोजनालाही बसतो.

सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या प्रकाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लाजिरवाणी घटना म्हटलं आहे, तर काहींनी थेट बीसीसीआयलाच भविष्यकाळात तरी हवामानाचा गंभीरपणे विचार करण्याचं आवाहन केलं. आता खरा प्रश्न असा आहे की, या धुक्यातून धडा घेऊन पुढील वेळापत्रक अधिक शहाणपणाने आखलं जाणार का? की पुन्हा-पुन्हा स्वतःचीच पुनरावृत्ती करत राहणार?

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!