धाराशिव – धाराशिवचं नामांतर होऊनही तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावर अजूनही ‘उस्मानाबाद’ नाव झळकत असल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधारी भाजपला डिवचलं आहे.
हिंदुत्वाचं पांघरूण घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नामांतराचा विसर पडला का? असा बोचरा सवाल सोमनाथ गुरव यांनी उपस्थित केला आहे.
तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावर ‘धाराशिव नगर परिषद – धाराशिव शहर पाणीपुरवठा योजना’ असा नवीन नामफलक लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दोन दिवसांत नामफलक बदलला नाही, तर शिवसेना स्वखर्चाने नवीन नामफलक लावणार, असा थेट इशारा देत सोमनाथ गुरव यांनी सत्ताधारी भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे.
नामांतराच्या मुद्द्यावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी थेट सत्ताधारी भाजपला डिवचल्याने धाराशिवच्या राजकारणात हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.











