• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले

MH25News by MH25News
December 7, 2023
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले
0
SHARES
0
VIEWS

नागपूर – मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

राज्याचे हिवाळी अधिवेशन आज पासून (गुरुवार) नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. शिंदे यांनी नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केले. ‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन राज्यांत भाजपला यश मिळाल्याने विरोधी पक्षाचे अवसान गळाले आहे. लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपला असे म्हणणाऱ्यांना देशातील जनतेने जागा दाखवून दिली असून त्यांनी मोदी यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी आता जनतेनेच देऊन टाकली आहे’, असे शिंदे म्हणाले.

Follow us on social media:

‘आमच्याकडे स्वाभिमान नसल्याचे विरोधक सांगत आहेत. वास्तविक ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? आम्ही दिल्लीला केंद्रातून निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी निधी मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. गेल्या अडीच वर्षांत अंहकारामुळे हे घरातून बाहेर पडले नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. राज्याचे नुकसान झाले. अनेक प्रकल्प बंद पाडले तर यांनी काही प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यापासून मेट्रो, आरेपासून अनेक प्रकल्प सुरू केले. हे सर्व प्रकल्प बंद पाडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी जलयुक्त शिवारसारख्या प्रकल्पाची चौकशी सुरू केली’, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका केली.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!