• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भारताची कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी

MH25News by MH25News
June 10, 2024
in क्रीडा, देश-विदेश, संपादकीय
0
भारताची कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
0
SHARES
3
VIEWS

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी अवघ्या 120 धावांचं माफक लक्ष्य होतं. मात्र त्यांना 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 113 धावा पर्यंतच मजल मारता आली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध 8 सामन्यांतील हा 7 वा विजय आहे.या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे ठरले. या दोघांनी आपल्या गोलंदाजीनं सामना फिरवला. एके काळी पाकिस्तानची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराहनं 4 षटकात अवघ्या 14 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून त्याला चांगली साथ दिली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीपनं सामन्यातील शेवटचं षटक टाकलं, ज्यामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 18 धावा करायच्या होत्या.तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियानं दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट गमावली. कोहली नसीम शाहच्या चेंडूवर 4 धावा करून पायचीत झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर आऊट झाला. रोहितनं 13 धावा केल्या. यानंतर डावखुरा फलंदाज अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावा जोडून डाव सांभाळला.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेजला फॉलो करा

Follow us on social media:

मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षरला नसीमनं बोल्ड केलं.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. एकेकाळी भारताची धावसंख्या 3 गडी बाद 89 धावा होती आणि संघाला या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळेल असं वाटत होतं. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. भारतानं 30 धावांत 7 विकेट गमावल्या.भारतीय संघ केवळ 19 षटके खेळू शकला आणि 119 धावा केल्या. रिषभ पंतनं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. त्यानं 31 चेंडूच्या आपल्या खेळीत 6 चौकार हाणले. अक्षर पटेलनं 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि नसीम शाहनं प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मोहम्मद आमिरला 2 विकेट मिळाल्या.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!