• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या

MH25News by MH25News
May 18, 2024
in क्रीडा, तंत्रज्ञान, देश-विदेश, संपादकीय
0
पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या
0
SHARES
0
VIEWS

पावसामुळे चेन्नई विरुद्धचा सामना पूर्ण 20 षटकांचा झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे जाणून घेऊया

आयपीएल 2024 मध्ये आज (18 मे) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार आहे. हा या हंगामातील सर्वात हाय वोल्टेज सामना आहे, कारण या सामन्याच्या निकालाद्वारे प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चाैथा संघ कोणता असेल, हे ठरणार आहे. हा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. जर पावसामुळे संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया

संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला तर, बंगळुरुला प्लेऑफला पात्र ठरण्यासाठी सामना 18 धावांच्या फरकानं किंवा धावांचा 18.1 षटकांत पाठलाग करावा लागेल. तर दुसरीकडे चेन्नईनं हा सामना जिंकला किंवा पावसानं सामना रद्द झाल्यास चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जरी चेन्नईनं सामना 18 पेक्षा कमी धावांच्या फरकानं गमावला तरी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

जर 15 षटकांचा खेळ झाला आणि चेन्नईनं 170 धावा केल्या, तर आरसीबीला 13.1 षटकांत लक्ष्य गाठवं लागेल. तसेच जर आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 152 धावांवर रोखावं लागेल.

Follow us on social media:

जर 10 षटकांचा खेळ झाला आणि आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 82 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर आरसीबीला हे लक्ष्य 8.1 षटकांत गाठावं लागेल.

जर 5 षटकांचा खेळ झाला आणि प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 50 धावा केल्या, त्यांना चेन्नईला 32 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या, तर आरसीबीला 3.1 षटकांत लक्ष्य गाठावं लागेल.

वरील सर्व गणितं पाहता, कितीही षटकांचा खेळ झाला आणि कितीही धावा निघाल्या, तरी आरसीबीसाठी एकच सूत्र लागू होतं, ते म्हणजे दिलेलं टार्गेट 11 चेंडू राखून पूर्ण करणे किंवा चेन्नईला 18 पेक्षा अधिक धावांनी पराभूत करणे. विराट कोहलीची टीम असं करण्यात यशस्वी ठरली, तर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!