नागपूर
छगन भुजबळांनी घेलेली भूमिका सर्वपक्षीय बैठकीत जे ठरवण्यात आले त्यानुसारच आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी काम करावे, असे ठरले होते आणि तिच भूजबळांची भूमिका आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.
बावनकुळे म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले जाईल असे सांगितले होते व त्याचे स्वरूप फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षणाप्रमाणे असेल असे स्पष्ट केले होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सध्या भुजबळ बोलत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही भुजबळांची भूमिका आहे.
जरांगे पाटील बीड मधील हिंसेबद्दल जे आरोप करीत आहे तो चौकशीचा भाग असून पोलीस त्याची चौकशी करीत आहे. त्याबद्दल मी बोलणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
(हे देखील वाचा – सर्वच 57 मंडळांना मिळणार पिकविम्याचे अग्रिम)
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आणि ओबीसी समाज समोर येतोय, त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, अशी टीका बावनकुळें यांनी केली.