धाराशिव – मागील काही दिवसांपासुन उमरगा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी हे सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या सुचनेनुसार अनेक दौरे किंवा कार्यक्रम आखत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. श्री.प्रवीण स्वामी हे स्थानिक आमदार असुनही त्यातील बहुतांश प्रक्रियेत त्यांना प्रशासनादवारे सामावुन घेण्यात आले नाही. विशेषत: स्वामी यांनी याबाबत मौन राखुन या प्रकारास मुक संमती असल्याचे दाखवुन दिले होते. यामुळे उबाठा गटातील अनेकांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी या प्रकाराबददल आंदोलन करून राग व्यक्त केला. व काहींनी सन्माननीय खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याकडे याबाबत स्वामी यांच्या दुटप्पी धोरणाबाबत तक्रारही केली. यानुसार खासदार महोदयांनी स्वामी यांची कानउघाडणी करून याबाबत खुलासा देण्याच्या सुचना केल्याचे समजते.

“इकडे आड, तिकडे विहीर” या गोंधळलेल्या व भांबावलेल्या स्थितीत स्वामी यांनी आणन-फाणन मध्ये जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१६/१०/२०२५ रोजी लेखी तक्रारही केली. या तक्रारीत स्वत:च्याच पत्रामध्ये स्वत:चेच नावाचा उल्लेख करणे व याबाबत त्यांच्याकडुन लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात येण्याचे सांगण्यात येणे, यावरून स्वामी हे भांबावलेले व गोंधळलेले दिसतात. तसेच त्यांना निवडुन येऊन जवळजवळ एक वर्षाचा काळ होत असुनही आजतागायत त्यांच्या अधिकाराची पुर्णपणे माहिती व मर्यादा दिसुन येत नाही, हे स्पष्ट होत आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक व जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.











