• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राज्य सरकारचं ३१ हजार कोटींचं मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी मोठा आधार- दत्ताभाऊ कुलकर्णी

MH25News by MH25News
October 7, 2025
in अर्थव्यवस्था, उद्योग, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
राज्य सरकारचं ३१ हजार कोटींचं मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी मोठा आधार- दत्ताभाऊ कुलकर्णी
0
SHARES
65
VIEWS

धाराशिव – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं मदतपॅकेज ही दिलासादायक आणि वेळेवरची घोषणा असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलेलं हे पॅकेज केवळ आकड्यांपुरतं न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरलं, तर हजारो शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी बळ मिळेल. अशी अशा व्यक्त केली आहे. खरडून गेलेल्या जमिनींना तसेच घरं व जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसह शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांगीण मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका ही खऱ्या अर्थाने मोठा आधार देणारी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात भागीदार म्हणून कार्यरत असून धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांतही गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली. कळंब, धाराशिव, वाशी, भूम या तालुक्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. या भागांतील पिकांची पाहणी करून शासनानं तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेतले होते याबद्दल प्रशासनाचेही आभार मानायला हवे. आता या पॅकेजमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवीन घरं, जनावरांच्या नुकसानीसाठी रोख मदत, तसेच शेतीसाठी रोख आणि मनरेगा माध्यमातून निधी ही संपूर्ण व्यवस्था पुन्हा उभी राहण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. राज्य सरकारनं या संकटाकडे ओला दुष्काळ म्हणून पाहण्याचा घेतलेला निर्णयही दूरदृष्टीचा आहे. महसूल वसुली, कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफी अशा अनेक सवलतींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा मिळणार आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!