धाराशिव – येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. या पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सेरेंटिका रिन्युएबल्सच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे तसेच ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन)चे वाटप करण्यात आले.
येरमाळा येथील प्रसिद्ध श्री. येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेस आज उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येरमाळा नगरीत दाखल होतात. या वर्षीच्या यात्रेत वाढत्या उष्णतेमुळे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सेरेंटिका रिन्युएबल्स च्या वतीने एक स्तूत्य उपक्रम राबविण्यात आला. कंपनीच्या वतीने मंदिर परिसर तसेच आंबराई परिसरातही भाविकांना मोफत पाणी बॉटल, बिस्किटे व ओआरएसचे वितरण करण्याचे प्रयोजन केलेले. या उपक्रमामुळे भाविकांना दिलासा मिळाला असून, कंपनीच्या कार्याचे कौतुक केले.
सेरेंटिकाच्या स्वयंसेवकानी भाविकांची तहान भागवण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. यात्रेतील गर्दी, उष्णता आणि वाढता प्रवास लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम भाविकांसाठी दिलासादायक ठरत असून, सेरेंटिकाच्या या पुढाकारामुळे यात्रेला सामाजिक सेवेची जोड मिळाल्याचे पाहायला मिळाले.
“आमचे अस्तित्व लोकांची सेवा करणे, समुदायांना बळकट करणे आणि राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावणे यासाठी आहे. आम्ही उभारत असलेले प्रत्येक प्रकल्प केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील कर्तृत्व नसून, तो विकास, सुलभ उपलब्धता आणि सन्मान यांचे एक महत्त्वाचे साधन आहे. आमचे प्रत्येक निर्णय हे सामाजिक जवाबदारीने घेतलेले असतात.” सुरजीत नारायण, असिस्टेंट वाईस प्रेजिडेंट, सेरेंटिका रिन्युएबल्स.
सेरेंटिका रिन्यूएबल्स हे आस्थापन धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यासह भुम आणि कळंब तालुक्यामध्ये हरित ऊर्जा निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय या आस्थापनाने डोळ्यापुढे ठेवले आहे. प्रकल्पाच्या नियोजनाच्या पहिल्या टप्प्यापासून ते अंतिम कार्यान्वयनापर्यंत, सेरेंटिका समुदायाच्या कल्याणाला, पर्यावरण संरक्षणाला आणि पारदर्शक संवादाला सर्वोच्च प्राधान्य देते. कंपनीचा मुख्य उद्देश उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे, ज्या केवळ राष्ट्राला ऊर्जा आणि गती देत नाहीत, तर भावी पिढ्यांसाठी चिरस्थायी सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्ये देखील निर्माण करतात.
सेरेंटिका रिन्यूबल्स चा विश्वास आहे की, खऱ्या प्रगतीचा अर्थ केवळ आधारभूत संरचना उभारणे नव्हे, तर जीवन सुधारणे, समुदाय मजबूत करणे आणि एका अधिक समृद्ध, समावेशक आणि शाश्वत भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देणे हा आहे.











