धाराशिव – सेरेंटिका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील विविध भागात पवनउर्जा प्रकल्प तसेच पवनउर्जा प्रकल्पाच्या विद्यूत वाहिनी उभारण्याचे काम सध्या सुरु आहेत. सेरेंटिकाच्या वतीने हे प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना कांही समस्या, तक्रारी असतील तर त्यांनी सेरेंटिकाच्या वतीने नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन १८०० २०२ ८७३५ या क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन सेरेंटिका रिन्यूएबल्स कंपनी कडून करण्यात आले आहे.
सेरेंटिका हे हरिज उर्जा क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत नाव असून ही कंपनी धाराशिव जिल्ह्यात पवनउर्जा प्रकल्प उभारणीचे काम करत आहे. हे प्रकल्प उभारत असताना पवनउर्जा प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांना कांही अडचणी, तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी, शेतकऱ्यांना थेट कंपनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधता यावा यासाठी सेरेंटिका कंपनीच्या वतीने टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे अनावरण करण्यात आले आहे.

या हेल्पलाईनला सध्या मोठा प्रतिसाद मिळत असून कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन न करता या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली समस्या कळवावी, कंपनी त्यावर योग्य उपाय योजना करेल असे आवाहन देखील कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे.
सेरेंटिकाच्या वतीने जिल्ह्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. कंपनीच्या वतीने गावात शुध्द पाण्याचे प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनी करत आहे. तसेच मागील कांही दिवसापुर्वी सेरेंटिका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ४० दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले आहे. कंपनी ही कामे कर्तव्य समजून करत असून शेतकऱ्यांनीही कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन सेरेंटिका रेन्यूएबल्स कंपनीकडून करण्यात आले आहे.











