धाराशिव तहसीलदारांचा सत्कार करताना पालकमंत्र्यांनी जनतेच्या भावनेचा विचार करायला हवा होता – मनोज जाधव सामाजिक कार्यकर्ते
धाराशिव – आज देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा होत असतानाच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर धाराशिव चे तहसीलदार सौ मृणाल जाधव यांचा जो सत्कार पालकमंत्र्यांनी केला तो अतिशय चुकीचा असून मागील आठच दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव येथे आले असता त्यांच्या जनता दरबारामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्या विरोधातच होत्या….
त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये जनतेच्या तक्रारी जाणून न घेता त्यांना योग्य तो न्याय देण्याचे काम आजपर्यंत केले नसून त्यांनी त्यांच्या काळात एन ए लेआउट प्रकरणांमध्ये अनियमितता केली असून सदरील प्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांना विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारून रीतसर चौकशी करण्याची विनंती केली असता त्यांच्या प्रश्नानुसार महसूल मंत्र्यांनी चौकशीकामी तहसीलदार जाधव मॅडम यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवत त्यांच्यावर चौकशी करण्यासाठी ॲडिशनल कलेक्टर यांची समिती नेमणूक करून तपास सुरू आहे तसेच त्यांच्यावर एका सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जमविल्याचा आरोप केला आहे याप्रकरणी सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत असताना धाराशिवच्या पालक मंत्र्यांनी तहसीलदार यांचा सत्कार करणे म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना येणाऱ्या काळात आणखीन चांगल्या प्रकारे कसा भ्रष्टाचार करता येईल यासाठीच प्रोत्साहित केले असल्याचा प्रकार असल्याचे मनोज जाधव यांनी यावेळी सांगितले











