• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मविआचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्त करु – खा. ओम राजेनिंबाळकर यांचे आश्वासन

MH25News by MH25News
November 7, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मविआचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्त करु – खा. ओम राजेनिंबाळकर यांचे आश्वासन
0
SHARES
166
VIEWS

धाराशिव – महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावेळी सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, याहीवेळी सत्ता आल्यास शेतकरी कर्जमुक्त करणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.त्यामुळं मोठ्या मतांनी आपले उमेदवार निवडून द्या असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. कळंब विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पळसप येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली.

राजेनिंबाळकर म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनाचा योग्य दर मिळत होता. त्यावेळी सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ११ हजार रुपये होता, मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या कारभारामुळे तो दर आता फक्त चार ते साडेचार हजार रुपयांवर घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.” याच मुद्द्यावरून ते म्हणाले की, “एकीकडे महायुती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य देण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करत आहे. हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका देणारे आहे.”

तसेच त्यांनी धाराशिव – कळंब मतदारसंघातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. “आज नोकऱ्यांच्या अभावामुळे धाराशिव – कळंबचा तरुण वर्ग पुणे आणि मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. पण हे स्थलांतर केवळ रोजगाराच्या संधींअभावी होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या संधी आणण्याची महायुती सरकारची असमर्थता यामुळे दिसून येते. पुण्यात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला. हे फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाले आहे,” असे निंबाळकर म्हणाले.

Follow us on social media:

याशिवाय, निंबाळकर यांनी तेर येथे संत गोरोबा काका मंदिराच्या विकासासाठी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. “संत गोरोबा काका मंदिराचा विकास करण्यासाठी राणा पाटील यांनी स्वतःची जमीन देण्याऐवजी एका गरीब व्यक्तीची जमीन अधिग्रहित केली. हे केवळ गरिबांच्या हक्कांवर अन्याय करणारे आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे पाऊल आहे. राणा पाटील हे गरिबांच्या घरावर नगर फिरवतात,” असे निंबाळकर यांनी आरोप केले.

या सभेत शेतकरी, बेरोजगार युवक, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. महाविकास आघाडीने या सभेतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगाराच्या संधीसाठी आवाज उठवला. धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात या सभेचा प्रभाव पडण्याची शक्यता असून, निवडणूक प्रचाराला एक नवी दिशा मिळाली आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!