धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजलेल्या एबी फॉर्म वाटप प्रकरणात अखेर शिवसेनेला माघार घ्यावी लागली आहे. एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षातील संपर्कप्रमुख राजन साळवी आणि वरिष्ठ नेत्यांना नडला म्हणून ज्या शिवसैनिकावर कारवाई करण्यात आली होती, त्या अविनाश खापे यांचं निलंबन अखेर रद्द करण्यात आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणात MH 25 News वर प्रकाशित झालेल्या बातमीचा थेट आणि निर्णायक इम्पॅक्ट झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सवाल विचारला म्हणून कारवाई?
एबी फॉर्म वाटपाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, भाजपच्या नेत्याकडे शिवसेनेचे एबी फॉर्म कसे पोहोचतात? असा थेट सवाल करणारे युवासेना पदाधिकारी अविनाश खापे यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या नावाखाली युवासेनेच्या बीड व लातूर जिल्हा निरीक्षक पदावरून हटवण्यात आले होते.
ही कारवाई म्हणजे गैरप्रकारावर बोट ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची गळचेपी असल्याचा आरोप त्यावेळी उघडपणे केला जात होता. MH 25 News ने उघड केला ‘आतला विषय’
या पार्श्वभूमीवर MH 25 News ने हे संपूर्ण प्रकरण ठळकपणे मांडत, एबी फॉर्म प्रकरणातील गंभीर प्रश्न सवाल करणाऱ्यावरच कारवाई का? दोषींवर कारवाई कुठे?
असे जळजळीत मुद्दे बातमीद्वारे जनतेसमोर आणले होते. या बातमीमुळे प्रकरणाला नव्याने तोंड फुटले होते.
तात्काळ दखल; निलंबन रद्द

MH 25 News वरील बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच पक्षाने हालचालींना वेग दिला. वाढता दबाव, कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि जनमताची दिशा लक्षात घेत अविनाश खापे यांचं निलंबन अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. माध्यमांची ताकद पुन्हा सिद्ध
या निर्णयामुळे एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे
माध्यमांनी जर ठामपणे सत्य मांडलं, तर सत्ताधाऱ्यांनाही माघार घ्यावी लागते. MH 25 News च्या बातमीने केवळ एक निलंबन रद्द केलं नाही, तर “सवाल विचारणं गुन्हा नाही” हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे.











