धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच जवळा गटातून धनंजय सावंत यांनी प्रचाराचा आक्रमक श्रीगणेशा केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात सावंत यांनी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेत जवळा, वाकडी परिसरात जबरदस्त जनसंपर्क साधला असून नागरिकांनी उघडपणे आपला कौल सावंत यांच्या बाजूने दिल्याचे चित्र दिसत आहे.
गावोगावी होत असलेल्या प्रचार फेऱ्या, घराघरांत पोहोचलेला संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका यामुळे सावंत यांच्या प्रचाराला वेग आला आहे. “फक्त आश्वासनं नाही तर ठोस विकास” ही स्पष्ट भूमिका मांडत सावंत यांनी प्रचारात धार आणली असून त्यांच्या शब्दांना जमिनीवरचा पाठिंबा मिळत आहे.
जवळा, वाकडी परिसरात युवक, महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सावंत यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. अनेक गावांमध्ये स्वयंप्रेरणेने प्रचार सुरू असून हा प्रतिसाद प्रतिस्पर्ध्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर धनंजय सावंत यांच्या प्रचाराचा वाढता झंझावात पाहता जवळा गटातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची जोरदार चर्चा आहे. जनतेचा स्पष्ट पाठिंबा आणि आक्रमक प्रचारशैली यामुळे सावंत हे निवडणुकीतील निर्णायक ठरणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











