पत्रक काढून कुणी अपयश लपवू नये, सोमनाथ गुरव यांचा टोला
धाराशिव – खासदार ओम राजे निंबाळकर यांनी शिंदे करताच कामाचा धडाका सुरू केला आहे. शहरातील रस्ते उद्याने व आठवडे बाजार यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. सदरील कामे एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली होती आणि आता शिंदेंनीच ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थगिती उठवली आहे त्यामुळे आता जे पत्रक काढणारे आहेत त्यांनी आत्तापर्यंत शहरासाठी किती कामे आणली याची यादी द्यावी आणि मग बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला आहे.
सोमनाथ गुरव म्हणाले की, राणा पाटील यांची सत्ता येऊ साधारण सहा महिन्याच्या जवळपास काल झाला आहे तसेच या अगोदरही सत्तेत असलेले राणा पाटील यांनी कोणती विकासकामे केली याची यादी आम्हाला दाखवावी. आम्ही तीन दिवसात या शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सोडवणूक करण्यासाठी जो निधी आणला त्यावर आमच्या अगोदर त्यांचं पत्रक बघितलं हे अत्यंत हास्यास्पद आहे; नव्हे तर यांच्या यांचं कर्तुत्व आता दिसून आला आहे. नुसत्या घोषणा आणि गप्पा यावर विकास होत नाही. विकासाचं विजन हवं आणि काम करण्याची सचोटी हवी तर विकास होतो अन्यथा 40 वर्ष या जिल्ह्यात जे झालं ते आपण पाहिला आहे. आत्ता उद्यानासाठी निधी मंजूर होतो म्हणजे साहजिकच आहे या चाळीस वर्षात एवढ्या मोठ्या शहरात एक चांगलं उद्यान राणा पाटील उभा करू शकले नाहीत हे या शहराचे दुर्दैव आहे. आत्ता प्रवेश केल्यानंतर जे एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले काम आज आपल्या नावावर खपवण्याचा राणा पाटील यांनी प्रकार सुरू केलाय तो किती लाजिरवाणा असल्याचं सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यापुढील ही काळात अशाच प्रकारे ओमराजेंच्या माध्यमातून आम्ही कामे करत राहणार आणि विकास काय असतो तो जिल्ह्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या पत्रक बाजी ना फक्त पेपर व माध्यमातून चर्चा होते पण आम्ही काम करताना हे जनतेच्या कल्याणासाठी करू आणि दृश्य स्वरूपात करू असा देखील विश्वास गुरव यांनी व्यक्त केला.











