धाराशिव – शेतीच्या वादाचे रूपांतर खुणामध्ये झाले असून आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करत खून करण्यात आला आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
करजखेडा येथील सहदेव पवार व प्रियंका पवार हे कामानिमित्त पाटोदा चौरस्ता येथे त्यांच्या टू व्हीलरवर जात असताना पाठीमागून हरिभाऊ चव्हाण यांच्या कारने जोराची धडक दिली. सहदेव पवार व प्रियंका पवार खाली पडताच गाडीतील हरिभाऊ चव्हाण व मुलगा जीवन चव्हाण याने दोघांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार जागीच मयत झाल्या तर सहदेव पवार हे धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मयत झाले. सहदेव पवार प्रियंका पवार यांच्या पश्चात दोन मुली व वयस्कर आई-वडील आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे.
सहदेव पवार व हरिबा चव्हाण यांच्यामध्ये चार वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता या वादाचे रूपांतर हाणामारी झाले होते. हरिबा चव्हाण यांच्या तक्रारीवरून सहदेव पवार यांच्याविरुद्ध ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता सहदेव पवार यांना या प्रकरणी चार वर्षाची शिक्षा देखील झाली होती. पंधरा दिवसापूर्वी सहदेव पवार यांची मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या आदेशाने जामिनावर मुक्तता झाली होती.

घटना समजताच बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
या वर्षात धाराशिव जिल्ह्यात भांडणाच्या घटना वारंवार घडत असून त्यामध्ये एकमेकावर हल्ला करण्याचे देखील घटना घडत आहेत धाराशिव जिल्ह्याची घोडदौड बिहारच्या दिशेने होते की काय अशी चर्चा धाराशिव जिल्हावाशिया मध्ये होत आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची शोध म्हणून सुरू असून पोलीस आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले आहेत.









